भगवंतावर विश्वास | मराठी प्रेरणादायी कहाणी Marathi kahani
एक लहान अशा जुन्या घरात एक वैद्यजी राहत होते. घराच्या समोरच्या भागात त्यांचा
दवाखाना होता आणि मागे ते परिवारा सोबत राहत होते.
ते वैद्यजी दररोज दवाखान्यात जायला निघाले की त्यांची पत्नी त्यांना दररोज संसाराला
लागणाऱ्या वस्तूची यादी एका चिठ्ठीत लिहून त्यांच्याकडे देत असे आणि वैद्य जी
आपल्या दवाखान्यात आल्यावर आपली साधी पूजा – अर्चना करून,
भगवंताचे नाव घेऊन, मगच ती पत्नी ने दिलेली चिठ्ठी उघडत असत.
त्यांच्या पत्नीने जी वस्तूंची यादी दिलेली असते त्या समोर, ती वस्तू घ्यायला लागणारी रक्कम
लिहित होते आणि शेवटी हिशोब करून भगवंताला प्रार्थना करीत की…
हे भगवंता मी तुमची भक्ती सोडून तुमच्याच आदेशानुसार या प्रपंचाच्या चक्रात येऊन,
आपली जवाबदारी पूर्ण करीत आहे.
ते वैद्यजी कधीच आपल्या तोंडाने रोग्याला पैसे मागत नसत. कुणी द्यायचे तर कुणी नाही द्यायचे.
पण एक गोष्ट निश्चित होती की… त्या दिवसाच्या सामानाचा लावलेल्या हिशोबाची रक्कम पूर्ण झाली की…
नंतर आलेल्यांकडून ते काहीच पैसे घेत नव्हते. मग तो येणारा रोगी गरीब असो किंवा श्रीमंत असो.
भगवंतावर विश्वास | मराठी प्रेरणादायी कहाणी | Marathi kahani
असाच एक दिवस वैद्याजी ने दवाखाना उघडला. आपल्या खुर्चीवर बसून भगवंताचे स्मरण करून
पैशाचा हिशोब लावण्यासाठी चिठ्ठी उघडली आणि त्यांना एकदम आश्चर्याचा धक्काच लागला…!
एकटक त्या चिठ्ठीत बघतच राहिले. काही क्षण त्याचे मन भरकटले, डोळ्यासमोर तारे चमकायला लागले.
परंतु दुसऱ्याच क्षणी त्याने आपल्या मनावर नियंत्रण मिळवले. गव्हाचे पीठ, तेल-तूप-मीठ,
तांदूळ-डाळ या सामानानंतर पत्नीने शेवटी लिहिले होते… मुलीचे लग्न येत्या २५ तारखेला आहे,
तिच्या लग्नाला, हुंड्याला लागणारे सामान”
काही वेळ विचार करून बाकी सगळ्या सामानांची किंमत लिहून लग्नाला लागणाऱ्या सामाना समोर
त्यांनी लिहिले, “हे काम भगवंताचे आहे, तो जाणे आणि त्याचे काम जाणे.”
नेहेमी प्रमाणे काही रोगी आले, त्यांना वैद्याने औषधी दिली. या दरम्यान एक मोठीशी
कार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्याने काही खास लक्ष दिले नाही, दर दिवशी
कुणी ना कुणी कार ने त्यांच्याकडे येत असत. आधी आलेले सर्व रोगी औषधी घेऊन निघून गेले.
तो सूट-बुटातला साहेब कारमधून बाहेर आला आणि नमस्कार म्हणत बेंचवर बसला.
वैद्यजी म्हणाले…. जर आपल्यालाऔषधी पाहिजे असेल तर आपण इकडे स्टूल वर या म्हणजे मी
आपली नाड़ी परीक्षण करू शकेल आणि कुणीदुसऱ्यासाठी औषधी हवी असेल तर
रोगाचे आणि स्थितीचे वर्णन करा.
ते साहेब म्हणू लागले, वैद्यजी, तुम्ही मला ओळखले नाही का…? माझे नाव हरीलाल आहे. आणि
आपण तरी कसे ओळखणार, कारण मी जवळपास १६ – १७ वर्षाच्या नंतर आपल्याकडे आलो आहे.
आपल्याला मी आपल्या मागच्या मुलाखतीबद्दल सांगतो, म्हणजे सारे काही समजून येईल.
जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा मी स्वतःहून आलो नव्हतो, खरे तर ती भगवंताची योजनाच
होती.भगवंताला माझ्यावर कृपा करण्याची इच्छा झाली होती, कारण त्याला माझ्या घरात आनंद
पाठवायचे होते. तसेच माझ्याही जीवनात भरभरून सुख आणायचे होते. आणि आपली ती पहिली भेट
आठवली की… आज देखील भगवंताच्या त्या साहजिक कृपेच्या प्रसंग आठवणीने… मी विनम्र होतो…
नतमस्तक होतो… अशब्द होतो…
घडले असे होते कि मी आपल्या बहिणीच्या घरी जात होतो. अगदी आपल्या दवाखान्याच्या समोर माझी
कार पंक्चर झाली. ड्राईवर कारचे चाक काढून पंक्चर लावायला चालला गेला. आपण बघितले कि मी
उन्हामध्ये कार जवळ उभा आहे. आपण माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याकडे बोट दाखवून आत
यायला विनंती केली, इथे खुर्चीमध्ये सावलीत बस म्हणून म्हणालात. आंधळ्याला काय दोन डोळेच
पाहिजे असतात, मी खुर्चीमध्ये येऊन बसलो. आपण मला यथोचित गूळ – पाणी देऊन तृप्त केले.
का कोण जाणे पण ड्राइवरने देखील काही जास्तच वेळ घेतला होता.
दुपार झाली होती. एक छोटीशी मुलगी आपल्या गादीपाशी उभी होती आणि म्हणत होती,
चला ना बाबा, मला भूक लागली आहे. आपण तिला म्हणत होता, बाळा थोडा धीर धर…
जाऊ यातच आपण.
भगवंतावर विश्वास | मराठी प्रेरणादायी कहाणी | Marathi kahani
मी हा विचार केला कि इतक्या वेळचा आपल्या जवळ बसलो आहे आणि माझ्यामुळे आपण जेवायला
देखील जाऊ शकत नाहीत. म्हणून काहीतरी औषधी विकत घेऊन टाकू, म्हणजे माझ्या बसण्याचा
भार हलका होईल, काही उद्देश प्राप्त होईल.
म्हणून मी आपल्याला बोलता बोलता म्हणालो, वैद्यजी मागच्या ५ – ६ वर्षांपासून मी अमेरिकेत राहतो,
व्यवसाय करतो तिथे. अमेरिकाला जाण्यापूर्वीच माझे लग्न झाले आहे, पण मी संतती-सुखापासून मात्र
अजून वंचित आहे. इथे भारतात देखील बरेच उपचार केले, तिथे अमेरिकेत देखील दाखवले…
पण पदरी शेवटी निराशाच पडली आहे.
आपण म्हणालात, भगवंतापासून निराश होऊ नका, तो अत्यंत दयाळू आहे, तो खूप मोठा दाता आहे.
आपण म्हणालात, लक्षात ठेवा त्याच्या कोषागारात कशाचीही कमी नाही. कसलीही इच्छा तो पूर्ण करतो.
संतती, धन-दौलत, इज्जत, सुख-दुःख, जीवन-मृत्यु, सारे काही त्याच्याच हातात आहे. ते कुणा
वैद्य किंवा डॉक्टरच्या हातात नसते. ते कोणत्या औषधाने मिळत नाही.
जे काही व्हायचे असते ते सारे भगवंताच्या आदेशानेच होत असते. संतती जरी द्यायची असेल तरी दाता
तोच आहे.
आज देखील तो प्रसंग जशाच्या तसाच माझ्या नजरेसमोर आहे. माझ्याशी हे सारे बोलत असताना,
आपण एकीकडे औषधाच्या पुड्या बांधत होतात. सगळ्या औषधी आपण दोन भागात विभाजित करून,
दोन वेगवेगळ्या पाकिटात टाकल्या, आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले,
आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ती औषधी देऊन…
घेण्याची विधी आपण समजावलीत.
मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्या मागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता.
परंतु… आपण पैसे घेण्याला नकार दिला. ‘बस, ठीक आहे’ म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला
तेव्हा आपण म्हणालात की, आजचे खाते बंद झाले आहे. मला काहीच समजले नाही.
परंतु या दरम्यान माझा ड्राईवर आलेला होता.. तो आपल्याला ओळखत होता, त्याने आपली चर्चा
ऐकून मला सांगितले की… आजचे खाते बंद झाले म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू
खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यां मार्फत
दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणा कडूनही घेत नाही.
मला स्वतःवरच राग आला… कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो.
माझे विचार किती खालचे होते आणि हा सरळ स्वभावाचा वैद्य किती महान आहे.
मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषध दाखवली आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला
तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले,
आणि ती म्हणाली ते वैद्यजी म्हणजे कुणी व्यक्ती-माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम
बनून आले आहेत. आजवर एवढी औषधी घेतली, एवढे वैद्य, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनाची
इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे.
हे औषध माझ्या संतती सुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊया.
हरीलाल वैद्याला पुढे सांगू लागला, आज माझ्या घरी दोन फूल उमलले आहेत. आम्ही दोघे पति-पत्नी
प्रत्येक क्षणाला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत
नव्हता की स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे दोन शब्द बोलावे म्हणून.
इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे.
वैद्यजी आमचा पूर्ण परिवार अमेरिके मध्येच राहत आहे. फक्त माझी एक विधवा बहीण आणि तिची
मुलगी इथे भारतात असते.
भगवंतावर विश्वास | मराठी प्रेरणादायी कहाणी | Marathi kahani
आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २६ तारखेला होणार आहे. का कोण जाणे जेव्हा-जेव्हा मी
आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी
यायची आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना
जाणत होतो, की संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतु असे वाटत होते कि माझ्या सख्ख्या भाच्चीच्या
बरोबर मला नेहेमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या
भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही,
कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा ‘भात भरण्याची’ माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे.
वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले आणि सौम्य आवाजात म्हणाले, हरीलाल जी आपण जे
काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, भगवंताची काय माया आहे हे त्याचे तोच जाणे.
आपण माझ्या ‘श्रीमती’ च्या हाताने लिहिलेली हि चिठ्ठीबघा” असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी हरिलालजी ला
दिली. तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून आश्चर्यचकित झाले, कारण “लग्नाचे सामान” याच्यासमोर लिहिले
होते ”हे काम भगवंताचे आहे, त्याचे तोच जाणे”
थरथरत्या आवाजात वैद्यजी म्हणतात, हरिलालजी, विश्वास करा की आज पर्यंत कधीही असे झाले नाही
की पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही.
आपण सांगितलेली संपूर्ण गोष्ट ऐकून असे वाटते कि भगवंताला माहित होते कि कोणत्या दिवशी
माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान
खरेदीची सुरवात भगवंताने कसा करवून घेतला असता…?
“वाह रे भगवंता, तुम्ही महान आहात…. तू दयावान आहात… मी आश्चर्ययात आहे की तुम्ही
कशा कशा रुपात येता…!
भगवंतावर विश्वास | मराठी प्रेरणादायी कहाणी | Marathi kahani
चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती ||१||
धेनु वत्सातें वोरसे | घरीं दुभतें पुरवी जैसें ||२||
पक्कान्न सेवुं नेणती बाळें | माता मुखीं घालीं बळें ||३||
एका जनार्दनीं बोले | एकपण माझें नेलें ||४||
वैद्यजी पुढे म्हणतात, “जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे.
सकाळी उठून तुमची भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे म्हणून त्या भगवंताचे आभार
मानायचे… संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्यांचे आभार मानायचे… खाताना…
झोपतांना… श्वास घेतांना…. असा प्रत्येक क्षणाला त्यांचे स्मरण करायचे… आभार मानायचे.
दळिता कांडिता | तुज गाईन अनंता ||१||
न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ||२||
नित्य हाचि कारभार | मुखी हरि निरंतर ||३||
मायबाप बंधुबहिणी | तू बा सखा चक्रपाणि ||४||
लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी ||५||
हे ही वाचा नक्कीच आवडेल :-
50+ Best Marathi Suvichar | मराठी सुविचार फोटो