सुंदर विचार – शिकण्यासारखे तर खूप काही… परंतु सध्या विस्मरण झालेले…!
१. दूध तापविण्या पासून तुपाला कढवे पर्यंत आमची आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे.
धेनु (गाय) मुळे माझा संसार आरोग्यसंपन्न आहे असे म्हणायची.
२. जरी श्रीमंती कितीही असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल नक्की लावावा
असे सांगत असे. असे का म्हणून विचारले तर म्हणायची, आपली श्रीमंती ही देवापुढे
कधीच नसते…! दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी.
घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.
३. सैनिकासाठी अन्नाचे एक शीत तरी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे…
नंतर तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो.
त्या लेकरांचे जीवन वाढते.
४. वाळवण घालतांना आज्जी सूर्यमंत्र म्हणायची. काळजी घे म्हणायची
माझ्या संसाराची.
सुंदर विचार, शिकण्यासारखे खूप काही पण सध्या विस्मरण झालेले
५. रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची.
कोरफडीचे पण लाड करायची. आम्हाला नवल वाटायचे.
तर म्हणायची… स्वतः शुष्क दिसते वरून पण खूप गुण अंगी आहेत.
एखाद्याला कधीही फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.
६. मुंग्यांना साखर ठेवायची आणि म्हणत असे की, मी दिलेल्या मार्गावरूनच
जा बायांनो…. तुम्ही सुखात राहा आणि माझ्या लेकरांना चावू नका.
७. दररोज तुळशीला दिवा लावायची. किडे – पाखुरे नष्ट होऊन घरात येत
नाहीत. ती माझ्या घराला आराम देते… मी तुळशीच्या पानांना उब देते.
८. घरात लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी
च्या उजेडात करावे असा आग्रह असे. भाकरी पण चंद्रासारखी वाटते , सावल्यांची
भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भू मातेला पण
शांतता मिळते म्हणायची.
सुंदर विचार, शिकण्यासारखे खूप काही पण सध्या विस्मरण झालेले
९. दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला
रांगोळी चिकटते म्हणायची.
१०. झोपताना तांब्याच्या तांब्यात पाणी भरून डोक्याशी ठेवायची.
चांगले असतेच पण तापलेल्या ‘भू’ चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि
आपल्याला शांती देते.
अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान
कधी लक्षातच घेतले नाही.
•••
देता आले तर पुढच्या पिढीला देण्यासारखे…!
घेता आले तर पुढच्या पिढीने घेण्यासारखे…!
छान काही वाचलेले.