Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar

0
522
Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar
Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar

Sunder Vichar |
लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे |
Suvichar

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी…
समोरच्याचा विचार करुन तर बघा…
तर कधी कोणाच्या हास्‍यासाठी…
तर कुणाच्या समाधानासाठीच
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा…
कधी असेही जगून बघा…!

जर व्यक्ती गरिब असला तर… लोकं म्हणतात….
या व्यक्तीला पैसे कमवायची अक्कल नव्हतीच.
म्हणूनच हा चार पैसे कमवू शकला नाही.

जर व्यक्ती श्रीमंत असला तर…. लोकं म्हणतात…
हा नक्की दोन नंबरचे काम करीत असणार…
त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होते का…?
प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत.
आम्ही चोवीस तास राब-राब राबतोय…
तरी झालो का श्रीमंत…?

Sunder Vichar |
लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे |
Suvichar

जर पैशाच्या मागे धावू लागला तर….
लोकं म्हणतात… ह्याला पैशाची खूपच हाव सुटली आहे…

जर पैशाला आयुष्यात महत्व दिले नाही तर…. लोकं म्हणतात…
त्याच्या आयुष्यात काहीच महत्वाकांक्षा नाही आहेत…!

जर नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर….
लोकं त्याला कवडी चुंबक म्हणतात.

जर मौज केली आणि थोडा पैसा खर्च केला तर….. लोकं लगेच
त्याला उधळ्या म्हणतात….

जर वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर… त्याचेही सुख लोकांना
पाहवत नाही… लगेच त्याला म्हणणार… तो बघा कसा बसलाय
आयत्या बिळावर नागोबा…! स्वत:चे काही कर्तृत्व दाखवले कधी
जीवनात…?

जर जीवनात कष्ट करून पैसे कमावले तरी… लोकांचे टोमणे काही
सुटत नाहीत… म्हणतात… काय उपयोग आहे त्याच्या जीवनाचा…?
नुसता पैशाच्या मागे धावत आहे… पण सुख उपभोगायला त्याच्याजवळ
वेळच नाही आहे…. असे तरी जीवन काय कामाचे…?

Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar

जर जास्त भाविक असला तर…. लोकं म्हणतात..
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव… आणि
जर मंदीरात गेले नाही तर…. लोकं नास्तिक म्हणतात…

जर तारुण्यात अकाली मृत्यू आला तर लोकं हळहळतात….
अरेरे…! फार लवकर गेला.
त्याचा भविष्यकाल खूप उज्ज्वल होता.

जर दीर्घायुषी झालात तर…. तेच लोक म्हणतील…
अजून किती दिवस सरकारची पेन्शन
खाणार कुणास ठाऊक…?

जर मनुष्य तब्येतीने बारीक असला तर….
लोकं त्याला झुरळ म्हणतात. आणि
जर जाड असला तर…. त्याला लोकं हत्ती म्हणतात.

जर लोकांची नजर बारीक माणसावर पडली तर म्हणतात…
तुझ्याकडे बघितले की देशात दुष्काळ पडला आहे असे वाटते…
आणि जर लोकांनी जाड मनुष्य बघितला तर म्हणतात….
हा दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो…!

जर सहजच कोणाला मदत केली तर लोकं म्हणतात…
यामागे नक्कीच याचा काहीतरी हेतू असणारच…. आणि
जर मदत नाही केली तर म्हणणार… याच्यामध्ये साधी
माणूसकी नाही बघा…

जर कुणी सरळ स्वभावाचा असेल तर लोकं म्हणतात… अंगात थोडातरी
स्वार्थ नक्की हवा. आणि जर स्वार्थी असलाच तर लोकं म्हणतात..
माणसाचा स्वभाव सरळ हवा… स्वार्थाची संपत्ती काय कामाची…?

जर माणसाचा स्वभाव खेळकर असला तर लोकं म्हणतात…
आचरट आहे. याला परिस्थितीचे गांभीर्य नाही आहे… आणि
जर गंभीर असला तर तेही लोकांना रुचत नाही… लोकं म्हणतात….
याला हसण्याची अलर्जी आहे वाटते…. अश्याने कोण जवळ येईल याच्या…!

Sunder Vichar | लोकं म्हणतात शेवटी जगावे तरी कसे | Suvichar

जर तुम्ही यशस्वी झालात तरी लोकांना अडचण होतेच. म्हणतात…
आमचे ऐकले म्हणूनच यशस्वी झाला. आणि जर तुम्ही अयशस्वी झालात तर…
लोकं म्हणणार…, याने आमचे ऐकले नाही…. आता भोगा कर्माची फळे…!

लोकांचे काय घेऊन बसलात…? तुम्ही जरी काहीही केलेत…
तरी त्याला नावे ठेवण्याची लोकांना सवय असल्यामुळे…
त्यांचे म्हणणे किती मनावर घ्यायचे…?

लोकं काय म्हणतील याची पर्वा करत आपले आयुष्य नासून का घ्यायचे…?

मंगेश पाडगावकरांनी फारच सुरेख शब्दात
ही भावना व्यक्त केली आहे…

फिदीफिदी हसतील ते हसू देत की…
बोटं मोडीत बसतील ते बसू देत की…!
आपण का शरमून जायचे…?
कशासाठी वरमून जायचे…?
कशासाठी भयाने ग्रासून जायचे…?
फुलायच्या प्रत्येक क्षणी
कशाला नासून जायचे…?
आपले जीवन आपण ठरवायचे…
कसे जगायचे…
कण्हत-कण्हत कि गाणे म्हणत…
हे आपणच ठरवायचे…!

खुप छान आहे… नक्की शेअर करा

धन्यवाद…!

Also Read

41+ Marathi Suvichar – जीवनावर आधारित मराठी सुंदर सुविचार

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here