शांत मनाने ऐका आणि कायम लक्षात ठेवा हे
motivational thoughts in marathi , sunder vichar in marathi ,
प्रेरणादायी मराठी सुंदर सुविचार , good thoughts in marathi,
best motivational thoughts in marathi |
चांगल्यापेक्षा वाईट काय ते आगोदर शिकायला हवे
रागात असतांना सुद्धा शब्दांची निवड अशी असायला
हवी की उद्या राग उतरल्यानंतर स्वतःच्या नजरेमध्ये
खजील व्हायला लागू नये.
शब्द फुकट मिळतात पण त्यांच्या निवडीवर ठरते की
त्याची किंमत मिळणार की किंमत चुकवावी लागणार.
काय सुंदर म्हटले आहे कोणी तरी श्वासांसोबत चालत होतो
तेंव्हा एकटा होतो. जसा श्वास थांबला… तसे सगळे सोबत
चालू लागले.
Relationship Quotes On Marathi | नाती सुविचार
विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटू लागतील.
नियत चांगली ठेवा काम आपो आप ठीक होत जातील.
तुम्ही कितीही तुमच्या हिशोबाने हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करा.
वरचा त्याच्या हिशोबाने हिशोब चुकता करुन घेतो.
यश हे नेहमी चांगल्या विचारांनी मिळते आणि चांगले विचार
हे नेहमी चांगल्या संबंधातून…. चांगल्या नात्यांमधून येतात.
म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा.
पाणी आणि माणसाची वाणी जेव्हा पण
मर्यादा सोडतात…. तेव्हा विनाशच होतो.
आरसा – कधी खोटे बोलत नाही. ज्ञान कधी भित्रेपणा
येऊ देत नाही. अध्यात्म कधी मोह होऊ देत नाही.
सत्य कधी कमजोर होऊ देत नाही प्रेम कधी ईर्षा होऊ देत नाही.
विश्वास कधी दुःखी होऊ देत नाही. कर्म कधी अयशस्वी होऊ
देत नाही.
best motivational thoughts in marathi |
सुंदर सुविचार मराठी
अहंकाराची करवत… स्वार्थाची तलवार…. आणि कपट
भावनेची कुऱ्हाड…. चांगल्या संबंधांना कापून टाकते.
माळी प्रत्येक दिवशी झाडाला पाणी देतो. पण झाडाची फळे मात्र
ठराविक कालावधीतच येतात. म्हणून संयम ठेवा प्रत्येक गोष्ट ही
वेळेवर होते. प्रत्येक दिवशी चांगले काम करत रहा….
फळ नक्कीच मिळेल.
जास्त देणारा नेहमीच फसवला गेला आहे. मग ते प्रेम असो…..
विश्वास असो…. अथवा कोणाची साथ असो….!
पक्षी कधीच त्यांच्या पिल्लांना भविष्यासाठी घरटे बांधून देत
नाही. ते तर फक्त त्यांना आकाशातउंच उडायला शिकवतात.
देवाची तुटलेली मूर्ती झाडाखाली बघून एक गोष्ट समजली की
आयुष्यात कधीही स्वतःला तुटू देऊ नका. कारण हे जग
तुटलेल्या देवांना घरात जागा देत नाही तिथे…. माणसाची
काय लायकी..
जीवनात सहन करायला शिकायला हवे. कारण…. आपल्यातही
अशा बऱ्याच कमतरता आहेत आणि तरीही इतर लोक
आपल्याला सहन करत असतात.
सौभाग्य म्हणजे ते जे सात पिढ्या उपभोगतात आणि दुसऱ्याचे
ओरबाडून जे मिळते ते सात पिढ्या भोगतात.
महत्वकांक्षा राजालाही गुलाम बनवतात.
संयम गुलाम असणाऱ्यालाही राजा बनवतो.
आपल्या आयुष्यातील कुठल्याही दिवसाला दोष देऊ नका.
चांगला दिवस आनंद घेऊन येतो आणि वाईट दिवस
अनुभव घेऊन येतो.
दोन गोष्टी मोजणे सोडून द्या. स्वतःचे दुःख
आणि दुसऱ्याचे सुख एवढे केले तर
आयुष्य सोपे होईल..
भाकरी खाण्यापेक्षा भाकरी बनवायला
जास्त वेळ लागतो. आणि भाकरी
बनवण्यापेक्षा भाकरी कमवायला जास्त
वेळ लागतो. आणि भाकरी कमवण्यापेक्षा
ती उगवण्याला जास्त वेळ लागतो म्हणून
ती खातांना आनंदाने खा आणि बनवणाऱ्याचे
आणि उगवणाऱ्याचे कृतज्ञ रहा…!
म्हाताऱ्या आई वडिलांना माहीत आहे की ते मुलांच्या
घरी राहतात. पण तसे राहत नाहीत जसे मुलं त्यांच्या
घरी राहत होते….!
best motivational thoughts in marathi |
सुंदर सुविचार मराठी
चांगल्या लोकांची संगत हे नेहमी आपल्यासाठी चांगलेच
भविष्य करते. कारण हवा जेव्हा फुलांना स्पर्श करून
जाते तेव्हा ती सुद्धा सुगंधित होते.
सवयी आणि संस्कार ठरवतात की माणसाची किंमत
कवडीमोल आहे की माणूस मौल्यवान आहे.
कर्म नेहमी विचार करून करा कोणाचा आशीर्वाद ही रिकामा
जात नाही आणि कोणाचा तळतळाटही रिकामा जात नाही.
नेहमी संपर्कात राहायला हवे. अनोळखी लोकांच्या
गोंधळापेक्षा आपल्या माणसांचे मौन त्रासदायक असते….!
जेव्हा विचारांना कीड लागते तेव्हा
नाते संपायला सुरुवात होते.
नाते जोडायचे तर कौतुक करायला शिका आणि
नाते तोडायचे तर खरे बोलायला शिका.
नातेवाईकांची तुमच्या सोबतची वागणूक ही कधी कधी
तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टी वर देखील ठरते.
जेंव्हा वेळ चांगली असते तेंव्हा तिरस्कार करणारेही जवळ येतात.
आणि जेंव्हा वेळ खराब असते तेंव्हा प्रेम करणारेही दुर जातात.
अंधारात आपली सावली देखील साथ देत नाही.
म्हातारपणात आपले शरीर साथ देत नाही.
सगळे आयुष्य मागे पळत राहिलो ज्याच्या…
शेवटी ते धनही सोबत येत नाही….!
सुख सुविधा आणि समस्या दोन्हीं
प्रमाणापेक्षा जास्त झाल्या तर
घातक ठरतात.
चलाखपणा…. खोटेपणा…. आणि निरलज्ज असणे….
यालाच आजकाल समजदारी म्हणतात.
आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत
असते…. एक तर परमात्म्याला आणि दुसरे आपल्या अंतरात्म्याला…..!
कोणाची नियत तुम्ही कधी बदलू शकत नाही.
कांदा कितीही प्रेमाने चिरला तरी डोळ्यात
पाणी हे येतेच.
डोळे बंद केले तर येणारे संकट थांबत नाही
आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत
नाहीत.
कोणी तुमच्या रस्त्यात खड्डे करत असेल तर घाबरु नका.
हे तेच लोक आहेत जे तुम्हाला मोठी उडी घ्यायला मदत
करतात.
तुमचे ध्येय तुमच्यासाठी सर्वात प्रिय असेल
तर तुमच्यावर होणारी टिका…. कौतुक….
तिरस्कार या कुठल्याच गोष्टी महत्त्वाच्या
राहत नाहीत…!
जखम लपवणे ही देखील एक कला आहे.
कारण… इथे पावला पावलावर लोक
मीठ घेऊन आहेत….!
घरे वेग वेगळी झाली आणि सगळी लहानपणी एकत्र
खेळणारे भाऊ – बहिण एकमेकांचे पाहुणे झाले.
जिथे हे जाणवेल की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होत आहे…
तिथुननिघून गेलेले कधीही चांगले.
आयुष्याने एक गोष्ट शिकवली…. जर आपल्याला माणसांच्या जवळ
राहायचे असेल तर मौन राहायला शिकायचे आणि आपल्या माणसांना
जर जवळ आणायचे असेल तर गोष्टी मनावर घेणे सोडून द्यायला हवे.
चाल खेळायला बुद्धिबळाच्या खेळात चांगली वाटते…..
नात्यांमध्ये नाही.
best motivational thoughts in marathi |
सुंदर सुविचार मराठी
फुल कितीही सुंदर असले तरी त्याचे कौतुक हे त्याच्या
सुगंधामुळे होते. आणि माणूस कितीही मोठा असला
तरी त्याला आदर हा त्याच्या गुणांमुळे मिळतो….!
तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला आणखी पोस्ट
लिहण्यासाठी प्रेरित करतो. विचार आवडले असतील तर
लाईक करा. आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करून ठेवा.
पुन्हा भेटू नवीन विचारां सोबत..
धन्यवाद…!
नाते सुविचार | Marathi Suvichar Quotes