Home Blog Page 12

10+ Clean Funny Jokes, Funny Slogan, दुकान के मजेदार स्लोगन

0
Clean Funny Jokes,-Funny Slogan- दुकान के मजेदार स्लोगन
Clean Funny Jokes,-Funny Slogan- दुकान के मजेदार स्लोगन

10+ Clean Funny Jokes
दुकान के मजेदार स्लोगन | 
पढ़कर आप हसे बिना नहीं रहेंगे.

कभी कभी ट्रक के पीछे या दुकान पर कुछ ऐसे घोष वाक्य [ Slogan ]  लिखे रहते है

जो कभी सोचने पर मजबूर करते है…. या प्रेरणादायी होते है…. तो कभी ऐसे भी slogan

पढ़ने मे आ  जाते है….  जिसको पढ़कर हम अपनी हंसी को रोक नहीं पाते.

इस पोस्ट में ऐसे ही कुछ मजेदार स्लोगन लाया हूँ.  जिनको पढ़कर यकीनन आ

प अपनी हंसी को नहीं रोक पाओगे.

1] एक सैलून वाले क़ी दुकान पर एक स्लोगन लिखा था….
आपके दिल पर के बोझ को तो हम कम नहीं कर सकते…. 
हाँ लेकिन आपके सिर पर का बोझ जरूर कम कर सकते हैं….!


2] एक चाय टपरी पर चाय वाले ने दुकान के सामने लिखवाया….
भले ही मैं आपको साधारण लग रहा हूं. 
लेकिन….  मैं चाय बहुत स्पेशल बनाता हूं….!


3] एक लाइट की दुकान वाले ने अपने बोर्ड के नीचे लिखा था की….
भले ही आपके दिमाग की बत्ती जले या ना जले…. 
लेकिन हमारा बल्ब ज़रूर जलेगा….!

4] एक होटल वाले ने तो सबसे अलग ही स्लोगन लिखा था….
हमारे यहां पर घऱ जैसा खाना बिल्कुल भी नहीं मिलता….  
आप निश्चिंत होकर अंदर आएं….!


5] एक फल की दुकान वाले ने तो स्लोगन लिखने की हद ही कर दी….

आप तो सिर्फ कर्म करते रहिए….  आपको फल हम दे देंगे….!

Clean Funny Jokes, Funny Slogan, दुकान के मजेदार स्लोगन

6] एक इलेक्ट्रॉनिक दुकान पर लिखा स्लोगन पढ़ा तो मैं भाव विभोर हो गया….
यदि आपके कोई फैन नहीं हैं. तो…. यहाँ से ले जाइए…!


7] एक पानीपूरी के ठेले पर एक स्लोगन लिखा था
पानीपूरी खाने के लिए आपका दिल बड़ा हो…. या ना हो….  
बस…. मुँह बड़ा होना चाहिए.


8] एक घड़ी की दुकान वाले ने तो एक गजब ही स्लोगन लिख डाला….
भागते हुए वक्त को चाहे अपने हाथ पर बांध लो…. या फिर दीवार पर टांग लो….!

 

9] एक ज्योतिषी ने बोर्ड पर स्लोगन लिखवाया….
आइए…. केवल 101 रुपए में अपने जीवन के आने वाले एपिसोड देखिए…!


10] एक बालों के तेल क़ी एक कंपनी अपने तेल की हर एक बोतल पर एक स्लोगन लिखा…
भगवान ही नहीं….  हम भी बाल बाल बचाते है….!


11] एक शराब की दुकान पर स्लोगन लिखा था….

शराब की बोतल खुद खाली होकर दूसरों को फुल कर देती है….!

Good Thoughts In Marathi | माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या

0
Good Thoughts In Marathi | माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या
Good Thoughts In Marathi | माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या

माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या | सुंदर विचार 
Good Thoughts In Marathi On Life

ग्रुप वर एक मॅसेज आला की अमुक बाई चे दहा दिवस आजारी राहून
दु:खद निधन झाले.

महिना – दीड महिन्या अगोदरच तीने आपला पन्नासवा वाढदिवस
साजरा केला होता.

तीन महिन्या नंतर सहजच तिच्या नवऱ्याला फोन केला… या अगोदर
एक – दोनदा फोन करण्याचा विचार आला होता. पण मनात विचार
येत होते की… त्या माणसाचा पूर्ण संसार विखरून पडलेला असेल…

नवऱ्याची फील्ड वर जायची नौकरी होती. दररोज सकाळी निघायचा
आणि रात्रीलाही यायला उशीर होत असे.

आज पर्यंत हीच सगळे बघत होती… घर सांभाळणे… मुलांचे शिक्षण….
सासू-सासरे… आले गेले पाहुणे…… सासू सासऱ्याचे आजारपण….
सगळी जवाबदारी हीच पार पाडायची.

कधी – कधी म्हणत असे की.. घर ही आपलेच.. माणसे ही आपलीच…
संसार ही आपलाच असला तरी…… कधीतरी या सगळ्यांचे आपुलकीचे
दोन शब्द मिळावे…… शाबासकी मिळावी… असे वाटतेच ना……
इतके कसे गृहीत धरू शकतात आपल्याला…….?

आज ही फोन लावतांना मनात आले…… बिचारा पूर्णतः गांगरून गेला असेल…
नव्याने आलेली घराची जबाबदारी… म्हातारे आईवडील…
ह्या वयातला एकटेपणा… कसे जमवून घेत असेल…?

शेवटी फोन लावला… बराच वेळ फोन वाजून थांबला…
उगाच मन चुटपूटले…

जवळपास एका तासानंतर त्यानेच फोन केला… मी फोन उचलला तसाच तो
म्हणाला… माफ करा आपला फोन नाही उचलू शकलो. सध्या संध्याकाळी
ब्याडमिंटन खेळायला पार्क मध्ये जातो. नवीन – नवीन मित्र भेटतात……
वेळ चांगला जातो. नांगपूरातच बदली करून घेतली आहे.

मी म्हणालो छान आहे. नंतर विचारलो… घरी सगळे काही ठीक आहे…?
त्यावर तो सांगायला लागला… स्वयंपाकासाठी घरी बाई ठेवली आहे.
तिलाच थोडे जास्त पैसे देतो… म्हणून ती भाजीचा आणि किराणा सामानही
आणते.

आईबाबांसाठी पूर्णवेळ काळजी घेण्यासाठी एक दुसरी बाई ठेवली आहे
होत आहे मॅनेज… तो सतत बोलत राहिला..
करायलाच पहिजे. जगाची रीत आहे… इत्यादि..

मी जसेतसे पुढची दोन वाक्य बोलून फोन ठेवला.
डोळे गच्च गच्च भरून आले…

डोळ्यासमोरून ती जाइच ना….

एकदा सासऱ्याला थोडे बरे वाटत नाही म्हणून ती राखी ला
माहेरला न जाणारी….

कधीतरी शाबासकी मिळावी असे म्हणणारी ती

मला आता तिला सांगावेसे वाटत आहे…
बाई गं…
कुणाचेच काही अडत नसते गं..

हे सगळे फक्त आपल्या मनाचे खेळ आहेत..
कदाचित आपणच आपली काढलेली समजूत म्हण..
पाहीजे तर..

That’s the problem with
putting others first…….
You have taught them
You come second…….!

वास्तव एकच…. ती गेल्यानंतर दोन कामवाल्या बायका अधिक ठेवल्या.
घर मार्गी लागले… आपणच आपला मान आणि आपली किंमत करत
नाही… खरे आहे ना…?

मग जीवनाचा आनंद घ्या. उगाच माझ्याशिवाय कोणी करत नाही…
याच्यातून बाहेर निघा. महत्त्वाचे म्हणजे स्वतः साठी वेळ काढा…!

माझी एक मैत्रीण | जीवनाचा आनंद घ्या | सुंदर विचार 
Good Thoughts In Marathi On Life

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविण्या [ ध्वजारोहण ] मधला फरक

0
red-fort-delhi-लाल-किल्ला-१५-ऑगस्ट-२६-जानेवारी-प्रजासत्ताक-दिवस-स्वातंत्र्य-दिवस
red-fort-delhi-लाल-किल्ला-१५-ऑगस्ट-२६-जानेवारी-प्रजासत्ताक-दिवस-स्वातंत्र्य-दिवस

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला
झेंडा फडकविण्या [ ध्वजारोहण ] मधला फरक

नमस्कार मित्रांनो…. VB Good Thoughts या संकेतस्थळावर
आपले मनापासून स्वागत आहे.

काल रस्त्यावर शालेय मुलांना बोलतांना बघितले. त्यांची आपसातील
झेंडा फडकावण्यावरून चर्चा सुरु होती.

मी थोडा वेळ थांबून त्यांचे बोलणे ऐकत राहिलो आणि त्यांच्या चर्चेत मी सहभागी
झालो आणि कळले की ते ट्युसन करून येत होते. आणि बोलता बोलता सहज
त्यांचा 15 ऑगस्ट चा विषय निघाला आणि त्यांची चर्चा रंगली.

काही मिनिटे त्यांच्या सोबत बोलून त्यांचा समाधान केले. आणि सगळ्यांना
एक – एक चॉकलेट देऊ मी निरोप घेतला.

घरी आल्यावर वाटले की जी मला थोडीशी माहिती आहे.. ही माहिती
आपल्या सोबतही शेयर करावीसी वाटली.

तर मग चला…. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविण्या
[ ध्वजारोहण ] मधला फरक जाणून घेऊया.

15 ऑगस्ट ला आपला देश स्वतंत्र झाला आणि ब्रिटीश झेंडा खाली उतरवून
आपला भारतीय ध्वज वर करून फडकविण्यात आला. आमचा राष्ट्रीय ध्वज
तिरंगा आमच्या अभिमान आणि गौरव चा प्रतीक आहे.

दर वर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविला जातो. 15 ऑगस्ट
आणि 26 जानेवारी आपले खूप महत्वाचे राष्ट्रीय उत्सव आहेत. या दिवशी
प्रत्येक भारतीय एक विशेष अभिमान बाळगत असतो.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविला जातो. परंतु 15 ऑगस्ट
आणि 26 जानेवारी ला झेंडा फडकविण्यात थोडा अंतर असतो.

ध्वजारोहण ( Flag Hoisting ) आणि
झेंडा फडकविणे ( Flag Unfurling )

15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस. या दिवशी आपला
राष्ट्रीय ध्वज तिरंगा वर ओढून नंतर फडकविला जातो. याला ध्वजारोहण
असे म्हणतात.
तसेच 26 जानेवारी ला आपला प्रजासत्ताक दिवस [ गणतंत्र दिवस ] असतो.

या दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज वर बांधलेला असतो. त्याला उघडून फडकाविला जातो.
याला झेंडा फडकविणे असे म्हणतात. इंग्रजीत ध्वजारोहण करीता Flag Hoisting
आणि झंडा फडकविण्यासाठी Flag Unfurling या शब्दाचा वापर केला जातो.

प्रधानमंत्री आणि राष्ट्रपति

15 ऑगस्ट ला आयोजित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात
देशाचे प्रधानमंत्री असतात.

या प्रसंगी फक्त देशाचे प्रधानमंत्रीच ध्वजारोहण करतात.
प्रधानमंत्री हे राजनीती प्रमुख असतात.

26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो.

26 जानेवारी ला आयोजित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपति
झेंडा फडकवितात. राष्ट्रपती हे घटनेचे [ संवैधानिक ] प्रमुख असतात.

flag-nation-delhi-लाल-किल्ला-१५-ऑगस्ट-२६-जानेवारी-प्रजासत्ताक-दिवस-स्वातंत्र्य-दिवस

लाल किला आणि राजपथ

15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस समारोहाचे आयोजन लाल किल्यावरच केला जातो.
या ठिकाणी देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. आणि या प्रसंगी ते पूर्ण
देशाला संबोधित करतात.

तसेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस [ गणतंत्र दिवस ] च्या मुख्य कार्यक्रमाचे
आयोजन हे राजपथ वर होतो. आणि या दिवशी आपले राष्ट्रपती झेंडा
फडकावितात.

26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा का फडकवितात….?

आपला देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला होता. स्वतंत्र देशाचा संविधान
26 जानेवारी 1950 पासून लागू झाला. आणि राष्ट्रपती हे संवैधानिक प्रमुख असतात.

या पूर्वी देशाचा संविधान नव्हता. आणि राष्ट्रपती हि नव्हते. यामुळेच दरवर्षी
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस खूप जोरात साजरा केला जातो. आणि
या दिवशी देशाचे राष्ट्रपती झेंडा फडकवितात.

प्रधानमंत्री आणि राष्ट्रपति यांचे देशाला संबोधन

15 ऑगस्ट ला प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत
असतात. तर या अगोदर संध्याकाळी म्हणजे 14 ऑगस्ट ला संध्याकाळी
राष्ट्रपति देशाला संबोधित करतात. गणतंत्र दिवस [ प्रजासत्ताक ] या दिवशी
कुणाचेही संबोधन होत नाही.

उत्सव मध्ये बदल

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे देशाच्या इतिहासातील खूपच महत्त्वपूर्ण दिवस
आहेत. या दोन्ही दिवशी खूप उत्साहाने देशाची राजधानी दिल्ली मध्ये सरकारी
स्थरावर सार्वजनिक समारोह [ उत्सव ] आयोजित केले जातात.

तसेच देशात इतर ठिकाणी आणि सगळ्या राज्यात या प्रसंगी भरपूर कार्यक्रम
आयोजित होत असतात. असे असूनही या कार्यक्रमात काही मूलभूत फरक
असतात.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस ला परेड चे आयोजन होत नाही. तर 26 जानेवारीला
सैनिक, अर्धसैनिक बल, इत्यादींची खूप लांब परेड होत असते. यामध्ये खूप
मनोहारी झांकी… आणि भरपूर रंगारंग कार्यक्रम होतात.

प्रजासत्ताक दिवस समारोहाच्या माध्यमातून देश आपल्या जल, थल आणि
नभ मध्ये आपली सैन्य शक्ती आणि आपल्या संस्कृतिच्या झलक चे प्रदर्शन
करीत असतो.

प्रमुख पाहुणे

15 ऑगस्ट च्या कार्यक्रमात, या कार्यक्रमाचे चे प्रमुक पाहुणे म्हणून बाहेरच्या
कुणी प्रमुख पाहुण्याला प्रमुखपदासाठी पाहुणा म्हणून बोलविण्याची परंपरा
नाही आहे. पण 26 जानेवारीला समारोहात कोणत्या ना कोणत्या राष्ट्राध्यक्षाला
प्रमुखपदी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले जाते.

सामान्य माणसाला 26 जानेवारी 2002 च्या अगोदर फक्त स्वतंत्रता दिवस
आणि प्रजासत्ताक दिवस या दोनच दिवसाला झेंडा फडकविण्याचे स्वातंत्र्य
होते. किंवा परवानगी होती. पण 26 जानेवारी 2002 ला भारतीय राष्ट्र ध्वज
संहिता [ इंडियन फ्लैग कोड ] मध्ये संशोधन केले गेले.

या संसोधना नंतर प्रत्येक भारतीयाला अधिकार मिळाले कि तो कोणत्याही
दिवशी ध्वजारोहण करू शकतो.
[ झेंडा फडकवू शकतो. / झेंडा वंदन करू शकतो. ]

या संशोधना नंतर जरी प्रत्येक भारतीयाला ध्वजारोहणा ची परवानगी
मिळाली…. तरीपण ध्वजारोहणासाठी काही नियम हि बनविले गेले.

आता बघूया ध्वजारोहण चे काय नियम आहेत.

तिरंगा ध्वजारोहण चे नियम

1] ध्वज संहितेनुसार तिरंगा ध्वज [ झेंडा ] हा हाताने विणलेल्या
सिल्क…. लोकर…. सूत…. अथवा खादीपासून तयार केलेला असावा.
ध्वज [ झेंडा ] हा आयताकार असायला पाहिजे.
ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 असेच असावे. कधीही
केशरी रंग खालच्या बाजूला ठेवून झेंडा लाऊ अथवा फडकवू नये.

2] सूर्योदया पासून तर सूर्यास्ता दरम्यान तिरंगा ध्वजारोहण करता येतो.
ध्वजाला कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून
फडकवू नये.

काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील
तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.

3] ध्वजाला कधीही पाण्यात बुडवू नये. ध्वजाचे कसल्याही प्रकारचे नुकसान
करू नये. ध्वजा चा कोणताही भाग जळलेला असल्यास किंवा ध्वजाबद्दल
अपमानास्पद टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास अथवा दंड अथवा
दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

4] ध्वजाचा व्यावसायिक वापर करू शकत नाही. जर ध्वजाचा कुणी
गैरवापर करीत असेल…. ध्वजाला कुणी साधा कापड समजून वापर करीत
असेल…. अथवा ध्वजाने मृतदेह गुंडाळत असेल [ शहीद जवान सोडून ]
तर तो भारतीय ध्वज [ तिरंगा ] याचा अपमान समजला जातो.

5] ध्वजा चा गणवेश म्हणून वापर करू नये. एखादी व्यक्ती जर कमरेच्या
खालील वस्त्रासाठी ध्वजाचा कापड म्हणून उपयोग करीत असेल तर…
तो ध्वजाचा अपमान आहे. ध्वजाचा रुमाल अथवा उशीसाठीही वापर
करता येणार नाही.

6] ध्वजा वर कुठल्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी अथवा
राष्ट्रीय दिवश जसे प्रजासत्ताक दिन [ गणतंत्र दिवश ] आणि स्वातंत्र्य दिनाला
ध्वज फडकविण्या अगोदर त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही.

7] कार्यक्रम…. सभारंभ…. काहीही असो. व्यासपीठावरील टेबलाला झाकण्यासाठी
किंवा त्या मंचाची सजावट करण्यासाठी ध्वज वापर करू नये.

तसेच गाडी…. रेल्वे…. अथवा विमानाचे छत किंवा दुसरा कुठलाही भाग
झाकण्यासाठी ध्वजाचा वापर मुळीच करता येणार नाही.
इमारतीत…. घरी…. कुठेही ध्वजा चा पडदा म्हणून उपयोग करण्यास
सक्त मनाई आहे.

8] फडकविलेला ध्वज त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला….
मळलेला…. किंवा चुरगळलेला ध्वज फडकवू नये. जर ध्वज फाटला वा
मळला तर एकांतात सन्मानाने पूर्णतः नष्ट करावे.

9] जर ध्वज एखाद्या मंचावर फडकवला असल्यास….. वक्ता भाषण करीत
असतांना ध्वज हे वक्त्याच्या उजव्या वाजूला असणे आवश्यक आहे.

10] दुसरे कोणतेही पताका वा झेंडा आपल्या राष्ट्रध्वजापेक्षा उंच अथवा
ध्वजावर… वा ध्वजा बरोबर लावू नये.

आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा देशाच्या अस्मितेचा प्रतीक आहे. कुठेही आपल्या
तिरंग्याचा अपमान होऊ देऊ नये. हा आमचा कर्तव्य आहे.

जय हिंद – वंदेमातरम

Marathi Suvichar |Sunder Vichar |निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल

0
Marathi Suvichar - निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल - Sunder Vichar
Marathi Suvichar - निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल - Sunder Vichar

Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल | Sunder Vichar

खुपच सुंदर संदेश आहे परंतु….
जेव्हा निवांत असाल तेव्हा एकदा मन लावुन नक्कीच वाचा….

1] गोष्ट खूप लहानशी असते….

रस्त्यावर चालत असलेल्या एखाद्या व्यक्तीला जर आपण पत्ता विचारला
तर तो पत्ता सहसा सापडत नाही. परंतु जर का तोच पत्ता आपण आपल्या
गाडीतून उतरून त्याच्या समोर उभे राहून… दादा हा पत्ता सांगता का…?
असे विचारले तर तो व्यक्ती चांगल्याप्रकारे पत्ता समजावितो आणि एखादी
हिंट नक्कीच देतो.
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

जेव्हा आपले मित्र, नातेवाईक आपल्याला स्टेशनवर सोडायला येतात.
आलेल्याला मित्र नातेवाईकांना घरी पोचल्यानंतर जर आपण त्यांना फोन
केला नाही… तर फारसे काहीच बिघडत नाही. परंतु जर एक फोन केला…
तर ते नाते आणखीनच जुळते….! तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु
करायची असते….!

Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल | Sunder Vichar

कधी तुम्ही अंधारात पाय अडखळुन पडलात… अगदी तसाच मागचाही पडू शकतो.
जर तुम्ही तिथेच थोडे थांबून मागून येणाऱ्याला सावध केले… तर अंधारातही त्याचे
डोळे बोलतात…! तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

आपापले सामान घेऊन तर सगळेच रेल्वे स्टेशन जाण्यासाठी पायऱ्या चढतात.
परंतु त्या वेळी तिथे पायऱ्या चढतांना अडचण होत असलेल्या एखाद्या आजीचा
हात धरून जर तिला मदत केली. तर तिने घट्ट धरलेला हात आपल्या आईची
नक्कीच आठवन करून देतो….
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

कधी कमी जागेत मोटारसायकल पार्क करत असतांना स्टॅंडवर मोटारसायकल
तिरकी न लावता…. जर गाडी स्टॅंडवर सरळ लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली….
तर त्याचे धन्यवाद ऐकायला मस्त वाटते…!
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

किराणा दुकानाच्या गर्दीत… तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने
जर त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली…. तर सामानाला नीट ठेवणे
तिला सोप्पे जाते….!
माणसा – माणसांतील निष्कारण असलेली बंधने गळून पडतात….!
तशी ही गोष्ट खूप लहानशी असते परंतु करायची असते….!

2] कधी कधी होत असते असे….!

आपण खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये राहतो…
खूप वर्षांनी एकाएक एका जवळच्या मित्राला
आपली आठवण येते….

आपली इच्छा असूनही आपण मित्राचा फोन उचलू शकत नाही.
मग संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला त्या मित्राची आठवण येते.
परत फोन करावा तर बोलायला आपल्याकडे विषयच नसतो.
आपण फोन करायचे टाळत असतो…

मग त्या मित्राचा दोन दिवसानंतर मेसेज येतो…
मित्रा… तुझ्या ऑफिसच्या बाहेर होतो… भेटलो असतो आपण….
त्यातच जुन्या आठवणी काढत बसतो आणि मनाला रमवत बसतो…
स्वतःला खोटेनाटे समजावित असतो…!
कधी कधी होत असते असे….!
🍁🍁🍁

कडक उन्हात आपण सिग्नल लाल असल्याने थांबलेले असतो…
एक म्हातारा आणि म्हातारी रस्त्याच्या बाजूला भिक मागत असते…
आपले मन दाटून येते… असे कसे लोकं आपल्या म्हाताऱ्या
आई – वडिलांना असे वाऱ्यावर सोडून देत असतील…?

आपला खिशात हात जातो… शंभराची नोट हातात येते…
आता व्यवहार ममतेची जागा घेतो. हे सर्व समोरील म्हातारा ओळखतो…
आणि आपल्याला बोलतो…. बाळा दहा रुपये दिले तरी खूप आहेत…
तो आपली पेचातून सुटका करतो
आपल्याला आपल्याच नजरेत लहान करून…!
कधी कधी होत असते असे….!

🍁🍁🍁

Marathi Suvichar | निवांतपणे वाचा नक्कीच आवडेल | Sunder Vichar

घरी दिवाळीचे पाहुणे जमलेले असतात…
आज कामवाली येणार की नाही
याची मनात धाकधूक चाललेली असते….
तिच्या असण्याने आपण किती निवांत असतो…
अशा वेळेसच याची जाणीव होते.

दुपारचे जेवण उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात…
कामवाली बाई येते… आणि आपले काम आटोपत असते…
आपण तिच्या मुलांना उरलेली बासुंदी द्यावी का ह्या संभ्रमात
असतांनाच कामवाली बाई आपल्या हातात एक डब्बा देते…
त्या डब्यात चिवडा लाडू असतो…!

साहेब तुम्ही दर वेळीच देता… आज तुम्हाला माझ्याकडून……
आता कोण श्रीमंत आणि कोण गरीब हा विचार आपला पिच्छाच
सोडत नाही.
कधी कधी होत असते असे….!

🍁🍁🍁

उन्हाळ्यात आपण गच्चीवर गाढ झोपेत असतो…
त्यातच उन अंगावर येताच आई उठविते.
आपल्या लक्षात येते कि आईला ताप आहे.
सुट्टीत आपण आलो आहे म्हणून अंगात उसने बळ आणते.
मेसच्या खाण्याने कंटाळला असेल म्हणून चार दिवस होईल
तितके पदार्थ पोटात आणि उरलेले डब्यात भरून येतात.

दिवस उलटत असतात आणि एके रात्री वडिलांचा फोन येतो….
जर काम झाले असेल तर तुझ्या आईला एक फोन कर…
आज तिचा वाढदिवस आहे.
निर्लज्जपणा म्हणजे हाच तो काय…!
झटपट फेसबुक च्या आभासी मित्रांना
दिलेल्या वाढदिवस शुभेच्छा आठवतात…..!

आपण लाजत आईला फोन करतो… त्यावर आई बोलते
” बाळा या वयात आमचा कसला रे वाढदिवस….? तू जेवलास ना…?
आपल्या तब्येतीला जप बाळा….”

कानात एकदाम गरम तेल ओतल्याचा भास होतो….
अश्रूं डोळ्यांतून मुक्त होऊन वाहायला लागतात.
आपल्या पासून काहीतरी खूप खूप दूर जात आहे…
असे आपल्याला जाणवत असते….! खरेच

कधी कधी होत असते असे….!
👍👍👍

Also Read :-

शुभ सकाळ || मराठी-सुविचार || Good-Morning Quotes In Marathi || Sunder Vichar

मराठी सुविचार – सुंदर विचार -Good Thoughts In Marathi On Life

Pausha Putrada Ekadashi Vrat Katha | पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा

0
Pausha Putrada Ekadashi Vrat Katha | पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा
पौष-पुत्रदा-एकादशी-व्रत-कथा-Pausha-Putrada-Ekadashi-Vrat-Katha

पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा
Pausha Putrada Ekadashi Vrat Katha

विभिन्न देवी देवताओं को समर्पित व्रत, पूजा, का नियम हिंदू संस्कृति में है.
और यह पूरे वर्ष चलता रहता है.

इस लेख की मुख्य बातें
  • पौष पुत्रदा एकादशी पौष माह के शुक्ल पक्ष में पड़ती है.
  • यह एकादशी व्रत महिलाओं के बीच संतान प्राप्ति के लिए लोकप्रिय है.
  • शास्त्रों में राजा सुकेतूमान और रानी शैव्या की रोचक कथा मिलती है

हर महीने में अलग अलग तिथि का अलग अलग महत्व है. और उसे अलग अलग
देवी देवताओं के साथ जोड़कर देखा जाता है. जिससे आपकी जिस देवी देवता में
श्रद्धा हो उसके अनुसार व्रत, पूजा, नियम का पालन किया जाता है.

महीने में दो बार कुछ महत्वपूर्ण व्रत आते है. जैसे एकादशी तिथि, [ ग्यारहवें दिन ]
और त्रयोदशी तिथि, [तेरहवें दिन ]

विष्णु भगवान् को समर्पित एकादशी व्रत शुक्ल पक्ष या कृष्ण पक्ष के ग्यारहवें दिन
और महादेव को समर्पित व्रत हर कुष्ण पक्ष या शुक्ल पक्ष की त्रयोदशी तिथि
[ तेरहवें दिन ] को मनाया जाता है.

सम्पूर्ण साप्ताहिक, मासिक एवं वार्षिक व्रतों, नियमों में एकादशी व्रत को सबसे
अधिक महत्वपूर्ण माना जाता है.

एक वर्ष, बारह महिनों में कुल 24 बार एकादशी व्रत आते है. और इनको
अलग अलग नामों से जाना जाता है. और सभी का एक अलग अलग महत्व होता है.

आज पौष पुत्रदा एकादशी के व्रत, नियम की जानकारी इस लेख में पढेंगे.
पौष माह में पड़ने वाली शुक्ल पक्ष की एकादशी को पौष पुत्रदा एकादशी व्रत कहा जाता है.

Pausha Putrada Ekadashi Vrat Katha | पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा

पुत्रदा एकादशी साल में दो बार आती है… एक पौष के महीने में और दूसरी श्रावण माह में.
पौष पुत्रदा एकादशी दिसंबर या जनवरी महीने में पड़ती है. जबकि श्रावण पुत्रदा एकादशी
जुलाई या अगस्त के महीने में आती है.

पौष मास की पुत्रदा एकादशी का उत्तर भारत में ज्यादा महत्व मानकर मनाते है…
जबकि श्रावण मास पुत्रदा एकादशी का अन्य क्षेत्रों में अधिक महत्व मानते है.

हिंदू वर्ष में पौष माह आमतौर पर ग्रेगोरि केलेंडर के अनुसार का पहिला महिना
जनवरी में सुरु होता है. किसी वर्ष यह एकादशी दिसंबर या जनवरी महीने में आती है.

यह एकादशी संतान प्राप्ति के लिए बेहद अहम मानते है.

पौष पुत्रदा एकादशी व्रत के साथ राजा सुकेतूमान की एक रोचक कथा जुड़ी हुई है.

पौष पुत्रदा एकादशी व्रत, कथा, महत्व (Pausha Putrada Ekadashi Katha )

भगवान श्री कृष्ण से धर्मराज युधिष्ठिर कहने लगे कि हे प्रभु…! पौष कृष्ण एकादशी
अर्थात सफला एकादशी का माहात्म्य बताकर आपने मुझ पर बड़ी कृपा की है.
अब आप कृपा करके मुझे पौष माह के शुक्ल पक्ष की एकादशी के विषय में भी बतलाइये.
इस एकादशी का क्या नाम है और इस एकादशी व्रत का क्या विधान है….? क्या विधि है….?
यह एकादशी व्रत करने से किस फल की प्राप्ति होती है….? और व्रत में किस देवता का
पूजन किया जाता है…? प्रभु कृपया यह सब विधानपूर्वक बताईये….

भगवान श्रीकृष्ण बोले : पौष माह के शुक्ल पक्ष मे आने वाली इस एकादशी को
पौष पुत्रदा एकादशी कहा जाता है. इस एकादशी में भी श्री विष्णु भगवान की पूजा की जाती है.
इस व्रत को विधिपूर्वक करना चाहिए. इस चर- अचर संसार में पुत्रदा एकादशी के व्रत के समान
दूसरा कोई व्रत नहीं है. इसके पुण्य से मानव तपस्वी, विद्वान और लक्ष्मीवान होता है.
महाराज युधिष्ठिर आपको मैं इसकी एक कथा सुनाता हूँ. तुम ध्यानपूर्वक सुनो.

पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा
Pausha Putrada Ekadashi Vrat Katha

सुकेतुमान नाम का एक राजा भद्रावती नामक नगरी में राज्य करता था.
उस राजा को कोई पुत्र नहीं था. राजा की पत्नी का नाम शैव्या था. रानी निपुत्री
होने के कारण हमेशा चिंतित रहा करती थी.

राजा के पितर भी रो – रोकर पिंड लिया करते थे और सोचा करते थे कि इसके बाद
हमको कौन पिंड देगा.

राजा के पास धन, हाथी, घोड़े, हुशार मंत्री थे लेकिन राजा आनंदित नहीं रहता था.
उसे समाधान नहीं था. उसके मन में हमेशा निपुत्रिक होने का दुःख ही रहता था.
उसके जीवन में संतोष नहीं था.

राजा के मन में हमेशा यही विचार आते रहता की मेरे मरने के बाद मुझको पिंडदान
कौन करेगा. पुत्र के बीना मैं पितरों और देवताओं का ऋण कैसे चुका सकूँगा.
जिस घर में पुत्र न हो उस घर में हमेशा अंधकार ही रहता है. इसलिए पुत्र
प्राप्ति के लिए प्रयत्न करना चाहिए.

पुत्र का मुख जिस मनुष्य ने देखा है… उसका जीवन धन्य हुवा है. उसके दोनों लोक
सुधर जाते है. पूर्व जन्म के कर्म से ही इस जन्म में पुत्र, धन वैभव आदि प्राप्त होते हैं.
इसी प्रकार जिस मनुष्य रात-दिन चिंता में डूबा रहता था.

एक बार तो राजा ने अपने शरीर को त्याग देने का निश्चय किया था. लेकिन आत्मघात को
महान पाप समझकर उसने ऐसा नहीं किया. एक दिन राजा ऐसा ही विचार करता हुआ
अपने घोड़े पर चढ़कर जंगल की और चल दिया तथा पक्षियों और वृक्षों को देखने लगा.
उसने देखा कि जंगल में प्राणी, पक्षी सभी घूम कर रहे हैं. हाथी अपने बच्चों और हथिनियों
के बीच घूम रहा है.

Nirjala Ekadashi | एकादशी | निर्जला एकादशी, व्रत, कथा, महत्व

पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा
Pausha Putrada Ekadashi Vrat Katha

इस जंगल के आनंदमय दृश्यों को देखकर राजा सोच विचार करने लगा. मन ही मन दुखी हुवा
और आकाश की और देखकर कहने लगा…. हे भगवंत मैंने लोककल्यान के लिए यज्ञ किये.
मेरे राज्य में प्रजा, ब्राह्मण आदि सभी सुखी है… फिर मुझे दुःख क्यों मिल रहा है……?
ये कहते हुए राजा वही बैठ गया.

थोड़ी देर बाद उसे प्यास लगी और वह पानी के लिए जंगल में इधर उधर भटकने लगा.
कुछ दूर जाने पर राजा को पानी से लबालब भरा हुवा सरोवर दिखा. सरोवर के चारो तरफ
मुनियों के आश्रम बने थे. राजा सरोवर के पास गया. पानी पीकर सरोवर के दृश्यों को
निहारने लगा. उस सरोवर में हंस, मगरमच्छ आदि प्रेम से विहार कर रहे थे.
राजा को उस वातावरण में अलग ही शांति का अनुभव हो रहा था.

राजा थोड़ी दुरी में बने आश्रम की और चार दिया और वह बैठे मुनियों को दंडवत प्रणाम करके
उन्ही के पास बैठ गया.

राजा के विनम्र स्वभाव से प्रसन्न होकर मुनियों ने कहा :- राजन तुम्हारी क्या इच्छा है… बताएं…
राजा ने पूछा : मुनिवर आप कौन हैं…. और किसलिए यहाँ आए हैं…. कृपा करके बताइए…

मुनि कहने लगे कि हे राजन….! आज संतान देने वाली पुत्रदा एकादशी है. हम लोग विश्वदेव हैं
और इस सरोवर में स्नान करने के लिए आए हैं.

यह सुनकर राजा कहने लगा की… मुनिवर मेरी भी कोई संतान नहीं है. अगर आप मुझ पर प्रसन्न हैं
तो एक पुत्र का वरदान दीजिए.

पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा
Pausha Putrada Ekadashi Vrat Katha

मुनि बोले :- हे राजन….! आज पुत्रदा एकादशी है. आप पुत्रदा एकादशी ही इसका व्रत करें.
भगवान की कृपा से अवश्य ही आपके घर में पुत्र होगा.

मुनि के वचनों को सुनकर राजा ने उसी दिन एकादशी का ‍व्रत किया और द्वादशी को
उसका पारण किया. इसके पश्चात मुनियों को प्रणाम करके महल में वापस आ गया.
कुछ समय बीतने के बाद रानी ने गर्भ धारण किया और नौ महीने के पश्चात उनको
एक पुत्र हुआ. वह राजकुमार अत्यंत शूरवीर, यशस्वी और प्रजापालक हुआ.

श्रीकृष्ण बोले: हे राजन…! पुत्र की प्राप्ति के लिए पुत्रदा एकादशी का व्रत करना चाहिए.
जो मनुष्य इस माहात्म्य को पढ़ता या सुनता है उसे अंत में स्वर्ग की प्राप्ति होती है.

पौष पुत्रदा एकादशी व्रत कथा
Pausha Putrada Ekadashi Vrat Katha

एकादसी, व्रत, जानकारी, पूजन, सूची | All Ekadashi’s Name List

विधि 

  • अगर आप पौष पुत्रदा एकादशी व्रत रखने जा रहे हैं तो दशमी के दिन
    सूर्यास्त से पहले भोजन कर लें.
  • व्रत के दौरान यह ध्यान रखें की…
    भोजन में प्याज लहसुन वगैरह का सेवन नहीं करें.
  • एकादशी वाले दिन ब्रह्ममुहूर्त में उठकर स्नान आदि से निवृत्त होकर
    और व्रत का संकल्प लें.
  • इस दौरान भगवान को पुष्प, अक्षत, रोली, धूप, दीप, फूल माला
    और नैवेद्य अर्पित करें और पुत्रदा एकादशी के व्रत की कथा पढ़ें.
  • संतान इच्छा के लिए इस दिन भगवान कृष्ण के बाल स्वरूप की
    पूजा की जाती है.
  • इसके पश्चात संतान गोपाल मंत्र का जाप करें.
  • इसके बाद विष्णु सहस्रनाम स्तोत्रम का पाठ करें.
  • पीले पुष्प, तुलसी, पीले फल, एवं पंचामृत आदि अर्पित करें.
  • शाम को विधि-विधान से भगवान विष्णु की पूजा और आरती के बाद
    जरूरतमंद अथवा गरीबों को यथासंभव दान दीजिए.
    इसके पश्चात पति-पत्नी को साथ में प्रसाद ग्रहण करें.

हरी ॐ श्री विष्णु  नारायण नारायण

Nirjala Ekadashi | एकादशी | निर्जला एकादशी, व्रत, कथा, महत्व

 

Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या

3
Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या
Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या

नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा.
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा.
नाते फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करते.
नाते ती असते जी आपलेपणाची जाणीव करून देते.

Marathi Suvichar On Relationship
नात्यांना वेळ देऊ या

एक्सपायरी डेट हि प्रत्येक गोष्टीची ठरलेलीच असते. मग ते एखादे नाते असो….
औषध असो वा कोणतीही वस्तू…. जर वेळेवर लक्ष दिले नाही…. अथवा पाहिजे
त्या वेळी वेळ दिला नाही…. तर त्या गोष्टी खराब होतात. पूर्णतः अनुपयोगी
होतात… उपयोग करण्याच्या लायक राहत नाहीत.

आपल्या आयुष्यातील नात्यांचेही काहीसे तसेच आहे. जर आपण त्यांना वेळ दिला नाही….
समजून घेतले नाही….. काहीही समझ दिला नाही तर हळू हळू आपले नाते संपत
जात असते.

ज्याप्रकारे औषधे…. अथवा खाण्याच्या वस्तू एक्सपायरी डेट निघून गेल्यावर ते खाणे
शरीरासाठी धोकादायक असते. ते खाल्यामुळे प्रकृती बिगळू शकते. अगदी तसेच
नात्यांचे आहे.

नात्यांना आपली ज्या वेळी गरज असते त्यावेळी आपण वेळ देत नाही…. ज्यावेळी
भावना व्यक्त करायचा असतात… त्यावेळी आपण भावना व्यक्त करीत नाहीत.
आणि एकदा का ती वेळ निघून गेली की त्या नात्यात आपल्याला पश्चात्ताप
करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग उरत नाही. कारण ज्यावेळी लक्ष देण्याची
आवश्यकता होती त्यावेळी आपण दुर्लक्ष करीत असतो….

Marathi Suvichar On Relationship
नात्यांना वेळ देऊ या

एका उदाहरणाद्वारे समजू या.

आपण गरम गरम जलेबी नेहमी आवडीने खातो परंतु त्याचा पीठ अंबवण्यासाठी रात्रभर
ठेवावे लागते. तेव्हा जाऊन त्या गरम जलेबीला एक विशिष्ठ अशी सुंदर चव येते.
आणि तो जलेबी खूपच चांगली बनवितो असे आपण म्हणत असतो.

आता विचार करा….. जर तो पदार्थ आपण अंबवलाच नाही किंवा गरजेपेक्षा जास्तच
वेळ तो अंबावत ठेवला तर काय होईल….?

समजा जर कमी वेळ अंबवला तर तो पदार्थ पाहिजे तसा बनणार नाही आणि त्याला
पाहिजे तशी चव येणार नाही तसेच अधिक वेळ अंबवत ठेवला तर तो पदार्थच खराब
होऊन जाईल. आणि त्याची चवही खराब लागणार.

जसे या पदार्थावर घाई केली तर काय परिणाम होणार आणि उशीर केला तर काय
परिणाम होणार… अगदी तसेच आपल्या नात्यांचे ही आहे. एकदम सेम.

जर नात्यांना अधिकच वेळ दिला तर त्या मधून त्या दोघांना पाहिजे तसा एकमेकांना
बद्दल आदर… प्रेम… ओढ… राहत नाही अथवा मग ते कमी होते. जर हीच गोष्ट उलट
केली तर…. आपण वेळच दिला नाही …. गरजेच्यावेळी उपयोगीच पडलो नाही…
पाहिजे तेव्हा प्रेम व्यक्तच केले नाही… वेळ दिला नाही… भेटी घेतल्या नाही…
कालांतराने ते नाते केवळ नावाचेच राहून जाते.

एका विशिष्ट वेळे नंतर भेटण्याची ओढ सुद्धा संपून जाते. वेळ न दिल्याने एकमेकांबद्दल
असलेली ओढ हळू हळू नाहीशी होते. प्रेम कमी होऊ लागते. आधी सारखा जिव्हाळा राहत
नाही….! म्हणून…. ज्याप्रमाणे आपण पदार्थांची चव चांगली राहावी…. ते वेळेतच खावे
या गोष्टींकडे लक्ष देतो. तो पदार्थ आणखी चांगला कसा होणार यावर लक्ष देतो…
अगदी तसेच काहीसे लक्ष आपल्या पासून लांब जाणाऱ्या नात्यांकडे दिले….
तर आपल्याला त्यातला गोडवा हा जीवनभर अनुभवता येईल.

केव्हा केव्हा नात्यांना छान सुवासिक फोडणी आणि मसालेदार तडका सुद्धा हवा….
मग बघा तुमचे नाते किती चविष्ट होते….!

Marathi Suvichar On Relationship | नात्यांना वेळ देऊ या

नात्यांची दोरी

नात्यांची दोरी फार नाजूक असते.
एकदा तुटली की परत जोडता येत नाही.
जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते.
नाते टिकविण्याची जबाबदारी दोघांची असते
एकाचे चुकले तर दुसऱ्याने ताणू नये.

हे ही वाचायला आवडेल :-

Husband Wife Relationship Quotes In Marathi | नवरा बायको प्रेम

Good Thoughts In Marathi | एक खूप मोलाचा संदेश | सुंदर विचार

0
Good Thoughts In Marathi - एक खूप मोलाचा संदेश - सुंदर विचार - vb
Good Thoughts In Marathi - एक खूप मोलाचा संदेश - सुंदर विचार

Good Thoughts In Marathi On Life
एक खूप मोलाचा संदेश | सुंदर विचार

जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावर एक मोठी लाट आली तेव्हा त्या लाटेने जातांना…
किनाऱ्यावर खेळत असलेल्या एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत
घेऊन गेली…..

हे बघितल्यावर तो मुलगा तिथल्या वाळुवर आपल्या नाजूक बोटाने लिहीतो कि
समुद्र हा चोर आहे.

त्याच समुद्राच्या दुस-या बाजुला एक मासे पकडणारा भरपूर मासे पकडतो…!
तो वाळुवर लिहीतो कि… समुद्र हा पालनकर्ता आहे.

एक तरूण मुलगा समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते कि…
समुद्र हा खुनी आहे.

त्याच समुद्राच्या एका दूस-या किना-यावर एक गरीब म्हातारा…
ज्याची म्हातारपणाने कंबर वाकलेली असते… तो आपल्या वाकलेल्या
कंबरेने किनाऱ्यावर फिरत असतो… फिरता – फिरता म्हाताऱ्याला
एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर
लिहीतो कि… समुद्र हा दाता आहे.

अचानक एक मोठी लाट येते आणि लिहीलेले सर्वकाही पुसले जाते

लोकांना काहीही म्हणू द्या… परंतु अथांग…! विशाल समुद्र…! हा आपल्या
लाटांमध्ये मस्त राहतो…

आपली भरती आणि ओहोटी… समुद्र आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो.

जीवनात जर विशाल… अथांग…. असे समुद्र बनायचे असेल… तर
कुणाच्याही बोलण्याकडे… टोमण्यांकडे लक्ष न देता… तुम्हाला जे करायचे
आहे… ते आपल्याच पद्धतीने करायचे… भूतकाळातील मुळीच विचार
करत बसू नये.

यश अपयश… मिळणे अथवा न मिळणे… सुख किंवा दुख…. या सगळ्यात
कधीही मन विचलित होऊ देऊ नये.

जर हे आयुष्य सुख, शांति ने भरलेले असते…
तर माणूस जन्माला येतांना रडलाच नसता…!

जन्माला येतांना रडणे… आणि मेल्यानंतर रडवीने… यामधील
संघर्षमय वेळेलाच कदाचित आयुष्य म्हणतात…!

Good Thoughts In Marathi – एक खूप मोलाचा संदेश – सुंदर विचार 

राम-नाम-माला-Good-Thoughts-In-Marathi-सुंदर-विचार-vb
राम-नाम-माला-Good-Thoughts-In-Marathi-सुंदर-विचार

श्री राम
मी तुमच्यामुळे सुखात आहे…
कारण तुमचे गोड नाव
माझ्या मुखात आहे…!

सहजच सुचलेले – छान विचार मराठी – Sunder Vichar

दोन दिवसांपूर्वी मी what’s app वर एक post वाचली…
post मोठी होती पण त्यात महत्वाचा मुद्दा असा होता की…

सरसर सरसर माळ जपली
तरी पण त्यात श्री राम काही आले नाही…

मी थोडा वेळ विचार केला आणि मला जे वाटले ते
थोडक्यात तुमच्या सोबत शेयर करीत आहे…

मित्रांनो मला असे वाटते की आपण सरसर माळ जपल्यावर
भगवंत कसा येईल…?

आता आपलेच उदाहरण घ्या… समजा कुणी आपल्याशी खूप
घाईघाईत आणि दुर्लक्ष केल्याप्रमाणे बोलले तर आपल्यालाही
ते आवडत नाही…

त्याउलट कुणी अगदी शांततेने… प्रेमाने बोलल तर जास्त भावते
आणि बरे हि वाटतेय…!

तसेच भगवंताचेही सरसर नाव…. किंवा स्तोत्र वाचण्यापेक्षा
आपण जी काही देवाची भक्ती करतो…
जो काही वेळ देवासाठी देतो तो फक्त देवाचा
आणि आपलाच असावा..
जेणेकरून आपली भक्ती भगवंता पर्यंत पोहोचेल…!

जर आपल्या मन… बुद्धी… कर्मात…. भगवंत असेल
तर आपल्या माळेत नक्कीच राम येईल….

जय श्री राम

जी-श्री-राम-Good-Thoughts-In-Marathi-सुंदर-विचार-vb
जी-श्री-राम-Good-Thoughts-In-Marathi-सुंदर-विचार

Good Thoughts In Marathi | एकत्र या | मराठी सुंदर विचार

Good Thoughts In Marathi - एक खूप मोलाचा संदेश - सुंदर विचार - एकता
Good Thoughts In Marathi, एक खूप मोलाचा संदेश – सुंदर विचार

आज बाजारात मी एका फळांच्या दुकानात केळी घेण्यासाठी गेलो…
दुकानदाराला मी एक डझन केळी चा भाव विचारला…
दुकानदार म्हणाला चाळीस रुपये साहेब…

दुकानदाराच्या किलो काट्याच्या जवळ काही केळी विखरून
पडलेली होती.
मी दुकानदाराला विखुरलेल्या केळीचा भाव विचारला…
दुकानदार म्हणाला… वीस रूपये डझन

मी म्हणालो : या केळींचा निम्मा भाव का…? हि केळ खराब आहेत काय…?
दुकानदार म्हणाला…. हि पण केळी चांगलीच आहेत साहेब… फक्त ह्या केळी
गुच्छातून तुटलेल्या आहेत…
साहेब ह्या केळी जर गुच्छातच राहिल्या असत्या तर याचाही भाव
चाळीस रुपये डझनच राहिला असता…
आपन या केळी निःसंकोचपणे घ्या…

Good Thoughts In Marathi - एक खूप मोलाचा संदेश - सुंदर विचार - एकत्र या
Good Thoughts In Marathi – एक खूप मोलाचा संदेश – सुंदर विचार

त्याच क्षणी मला समजले की…. जो व्यक्ती आपला संघटन…
आपला गट… आपला समाज… आणि आपला परिवार
याच्या पासुन वेगळा होतो… त्या व्यक्तीची किंमत…
अर्ध्यापेक्षाही कमी होऊन जाते…!

एक विनंती आहे कि… आपले कितीही मतभेद झाले… मनभेद झाले…
तरीपण आपण आपला परिवार… गट… संघटन… समाज… आणि मित्र…
ह्यांच्याशी नेहमी जुडलेले रहा… संपर्कात राहा… सगळ्यांसी मिळून
मिसळूनच रहा.

मित्रांनो…
सोबत या… सोबत रहा…
सोबतच काम करा…
एकमेकांवर प्रेम करा…
एकमेकांचा आदर करा…
एकमेकांना मदत करा…

Good Thoughts In Marathi | एकत्र या | मराठी सुंदर विचार

जगणे हि महाग झाले आहे | बालपण
Childhood | सुंदर विचार

मोठे झाल्यावर कळले की
खेळणी महाग नसतात…
बालपणच खूप महाग असतो….!

मला आठवीत आहे…
आम्ही खूप मोठे होत पर्यंत
लहानच होतो. तेव्हा सगळे काही
स्वस्तच होते… बालपणही….!

Good Thoughts In Marathi - एक खूप मोलाचा संदेश - सुंदर विचार - बालपण
Good Thoughts In Marathi – एक खूप मोलाचा संदेश – सुंदर विचार – बालपण

आपल्या बालपणात बालपणाला मनसोक्त उपभोग घेतला.
कुठेही गेले तरीपण उन्हात…. पावसात…. मातीत…. नदीवर….
घराच्या समोरील आणि मागील दोन्ही अंगणात…

गावाबाहेरील मोकळ्या जागेत… सर्वत्र बालपणरुपी हिरव्या
गवताची चादर सगळीकडे पसरलेली राहत असे.
परंतु आता तसे नाही आहे….!

आता तर मुले लहानपणातच खूप मोठी होऊन जातात.
भरपूर महाग झाले आहे बालपण…!

आई पूर्वी खूप स्वस्त होती….. ती पूर्ण वेळ आईच असायची…

लहानपणी सकाळ झाल्यावर झोपेतून उठवण्यापासून
आंघोळ…. जेवण…. शाळा… खेळ… संध्याकाळी जेवण…
झोपे पर्यंत… आईच होती… रागवायची… प्रेम करायची…
मारायची…

भीती दाखवून जेवायला लावायची…. पूर्ण वेळ आईच असायची….
सगळीकडे आईच दिसायची. ही आई आता मम्मी झाली आहे…
आणि मम्मी खूप महाग आहे…!

मम्मी जॉब करते… सकाळी लवकर उठून घाईघाईने
कामे आवरून जॉब वर जाते.
पूर्ण वेळ मम्मी फक्त रविवारलाच उपलब्ध असते…!

मामा – मावशीचे गाव आता राहिले नाहीत…! प्रेमळ मामा – मामी,
मावशी – मावशा, आत्या – मामा आता पूर्वीसारखी नाते राहिले नाहीत….
पूर्वी सगळे आपली वाट पाहायचीच…

आता सगळ्यांना कुणीही नकोसे झाले आहे….! हा सगळा परिस्थितीचा
दोष आहे. तेव्हा बालपणाच्या सोबतच मित्र हि खूपच स्वस्त होते….!

आपल्या हाताची दोन बोटे त्याच्या हाताच्या बोटांवर टेकवून
साधे बट्टी म्हटले की नेहमीची मित्रता होत असे.

शाळेच्या निळ्या हाफ पेंट मध्ये खोचलेला पांढरा शर्ट बाहेर काढून
त्यात संत्रा गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी
वाटून खाल्ली की झाली पार्टी…!

आताच्या मुलांना तर आधीच घरून सूचना असते….
बेटा डोंट शेअर युअर टिफिन कळले…!
आता मित्रता खूपच महाग झालेली आहे.

ते दिवस म्हणजे हेल्थला आरोग्य म्हणायचे दिवस होते….!

सायकलचा एक जुना फाटकासा टायर आणि बांबूची
एक दीड हात काठी इतक्याच भांडवलावर संपूर्ण गावाला
धावत फेरी घालतांना तबियत अगदी स्वस्तात मस्त होऊन जायची….!

जुन्या कापडाने घट्ट बांधून बनवलेल्या कापडी बॉलने
आप्पाधाप्पी खेळत असतांना आपली पाठ स्वस्तातच
इतकी मजबूत झालेली आहे की… आयुष्यात कशीही परिस्थिती
आली तरी कधी ही पाठ वाकली नाही…! आणि आता इम्युनिटी बूस्टर
औषधी भरपूर महाग झालेली आहेत असे म्हणतात….!

पूर्वी ज्ञान…. शिक्षण…. पुस्तके…. इत्यादी किती स्वस्त होते.
केवळ वरच्या वर्गातल्या मुलाशी बोलनी करून ठेवून….
द्वितीय संत्रान परिक्षा झाली की त्याचीच पुस्तके अर्ध्या किंमतीत
मिळून जात असत. आणि जुन्या वह्यांची उरलेली
कोरी पाने काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.

आता मात्र पाटीची जागा फोन ने घेतली आहे…
आज ऑनलाईन शिक्षण न परवडणारे झालेले आहे.

इतकेच काय…. मित्रांनो….
कालपरवा पर्यंत तर मरण ही तरी स्वस्तच होते….
परंतु आता तर मरण ही पाच – सात लाखांचे बिल झाल्याशिवाय
येईनासे झाले आहे….!

म्हणूनच म्हणत आहे…. जोवर आहोत तोवर आठवत रहायचे….
नाहीतर आठवणीत ठेवायला ही कुणीही नसणार….!

Good Thoughts In Marathi - एक खूप मोलाचा संदेश - सुंदर विचार - बालपण
Good Thoughts In Marathi – एक खूप मोलाचा संदेश – सुंदर विचार – बालपण

Good Thoughts In Marathi On Life
एक खूप मोलाचा संदेश | सुंदर विचार

प्रवचन करीत असतांना समोर बसून प्रवचन ऐकत असलेल्या भाविकांमधून
एका तरुणाला गुरुजी बोट दाखवून उभे राहायला सांगतात.

तरुण मुलगा उभा झाल्यावर गुरुजी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात करतात.

गुरुजी म्हणाले :- बाळा जर तु कुठे फिरायला गेला आहेस. फिरत असतांना
तिथे एखादी सुंदर मुलगी समोरून येतांना दिसली. तर तु काय करणार…?
तरुण म्हणाला – मुलगी दिसल्यावर मी त्या मुलीचा व्यक्तिमत्व बघणार.

गुरुजीं म्हणाले – ती मुलगी समोर गेल्यानंतरही तू मागे वळून पाहणार का….?
तरुण म्हणाला – हो गुरुजी… परंतु जर माझी बायको माझ्यासोबत नसेल तरच…
( बसलेले सगळे भाविक हसतात )

आता परत गुरुजींनी विचारले – मला सांग बाळा तुला तो सुंदर चेहरा किती दिवस
आठवणीत राहणार…?
तरुण म्हणाला – पाच ते दहा मिनिटे अथवा दुसरा सुंदर चेहरा दिसे पर्यंत.

गुरुजी त्या तरुणाला म्हणाले – बाळा आता तु एक कल्पना कर….
तू सूरत वरून मुंबईला जात आहेस… आणि मी तुला एक पुस्तक असलेले पाकीट दिले
आणि तुला सांगितले की…. हे पाकीट मुंबईतील या महान माणसाकडे पोहोचवावे…!

आता बाळा तो पाकिट पोहोचवण्यासाठी तू त्या माणसाच्या मुंबईतील घरी पोहचलास….
जेव्हा त्या माणसाचे तू घर बघितले तेव्हा तुला कळले की या माणसाचा तर
खूप मोठा बंगला आहे आणि हा माणूस तर अब्जाधीश आहे.

त्यांच्या बंगल्याच्या पोर्च मध्ये दहा वाहने उभी आहेत आणि पांच वॉचमन
बंगल्याच्या बाहेर उभे आहेत. तू आपल्या येण्याची माहिती पॅकेटसह पाठवली.
माहिती मिळताच ते साहेब स्वतः बाहेर आले आणि तुला नमस्कार केला.

त्यांनी तुझ्या कडून ते पॅकेट घेतले. नंतर तू परत जाण्याची परवानगी घेतली
तेव्हा त्या साहेबांनी तुला विनंती केली की… आत चला आणि सोफ्यावर
तुझ्या सोबतच जवळ बसले आणि काही वेळ बोलून दोघेही जेवायला बसलात.
चांगले जेवण दिले. आता तू परत होत आहेस… आणि ते साहेब विचारतात की
आपण माझ्या घरी कसे आलात….? तू म्हणालास – लोकल ट्रेन मध्ये.

हे समजल्यावर त्या साहेबांनी आपल्या ड्रायव्हरला तुला तुझ्या गंतव्यस्थानावर
घेऊन जाण्यास सांगितले. आणि तू तुझ्या ठिकाणी पोहोचणार इतक्यात
त्या अब्जाधीश साहेबाने तुला फोन केला आणि विचारले – दादा आपण
आरामात पोहोचलात का…..!

आता सांग बाळा… तू त्या अब्जाधीश गृहस्थांची आठवण किती दिवस ठेवणार….?
यावर तो तरुण मुलगा म्हणाला – गुरुजी….! त्या माणसाला तर मी जीवनभर
विसरणारच नाही, मरे पर्यंत माझ्या आठवणीत राहणार.

त्या तरुण मुलाच्या माध्यमातून सगळ्या भाविकांना संबोधित करतांना
गुरुजी म्हणाले – ” हेच आयुष्याचे वास्तव आहे.”

सुंदर चेहरा काही वेळासाठी आपल्या आठवणीत राहतो…
परंतु सुंदर वागणूक जीवनभर आठवणीत राहते.
हाच आयुष्याचा गुरुमंत्र आहे…

तुमच्या चेहऱ्याच्या आणि शरीराच्या सौंदर्या पेक्षा तुमच्या वागण्याच्या
सौंदर्यावर आपले लक्ष अधिक केंद्रित करा.
तुमचे जीवन स्वतःसाठी आनंददायी आणि इतरांसाठी
अविस्मरणीय प्रेरणादायी बनेल.

Good Thoughts In Marathi On Life
एक खूप मोलाचा संदेश | सुंदर विचार

Good Thoughts in Marathi | प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

3
Good Thoughts in Marathi | प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

Good Thoughts in Marathi
प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

एक माणूस आपल्या मालकाला न सांगता एक दिवस तो कामावर
गैरहजर राहिला… याचे मालकाला खूप वाईट वाटले की ह्या माणसाने
मला न सांगता सुट्टी मारली.

नंतर मालकाला विचार आला… जर मी याचा पगार वाढविला तर हा
नक्कीच मन लावून काम करणार… आणि गैरहजरही राहणार नाही.

तो माणूस दुसऱ्या दिवशी कामावर हजर झाला तर त्याला मालकाने
काहिच म्हटले नाही आणि महिना भरल्यानंतर त्याला त्याची जुनी पगार
आणि काही पैसे वेगळे दिले… यावर तो माणूस काहीही बोलला नाही…
आपले पैसे घेऊन निघून गेला…

आठ महिन्यानंतर पुन्हा तसेच घडले…. मालकाला न सांगता कामावर
गैरहजर राहीला… यावेळी मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने
विचार केला कि… याचा पगार वाढवून काही फायदा नाही आहे…
याला कामाची काही जवाबदारी नाही आहे…
हा काही सुधारणार नाही…

या महिन्याची पगार देतांना मालकाने त्याला त्याचा जुनाच पगार दिला…
वाढीव पैसे दिले नाहीत…

यावेळी ही तो काहीही बोलला नाही… त्याने कोणतीही तक्रार केली नाही…
आणि चुपचाप जायला निघाला… याचे मालकाला खूप आश्चर्य वाटले…
शेवटी मालकानेच त्याला विचारले…

बापु कसा रे तु…? मागील वेळी तु न सांगता सुट्टी घेतली…
तुझा पगार वाढविला… तु काहीही बोलला नाहीस…
या महिन्यात पुन्हा न सांगता सुट्टी घेतली म्हणुन मी तुझा पगार
कमी केला…! यावेळी तु काहीही न बोलता जात आहेस…!
हे काही समजले नाही मला….!

Good Thoughts in Marathi
प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

यावेळी त्या कामगार माणसाने जे उत्तर दिले ते अगदी मनाला
भिडणारेच होते…

कामगार माणूस म्हणाला…
साहेब पहिल्यांदा ज्यावेळी मी तुम्हाला न सांगता सुट्टी
घेतली त्यावेळी मला मुलगा झाला. होता… मी दवाखान्यात होतो…
आपण मला पगार अधिक दिला.. तर मी विचार केला की…
भगवंताने माझ्या मुलाचा खाण्याचा खर्च पाठविले आहे…. आणि

या महिन्यात ज्यावेळी मी सुट्टी घेतली त्यावेळी माझी आई वारली
होती…

आता आपण माझा पगार कमी केलात… तर मी असे मानत आहे की…
माझ्या आईने आपला वाटा आपल्या सोबत नेला…
मग मी कशाला पगाराची काळजी करू…? हि जवाबदारी तर
भगवंताने स्वत:च घेतलीं आहे…!

मित्रांनो…
जर कुणी असे विचारले की… आयुष्यात काय कमविले…?
आणि काय गमावले…? तर निःसंकोचपणे सांगा
मित्रा…
जे मी गमावले ते माझे अविचार होते….!
आणि जे कमावले ती माझ्या भगवंताची
कृपा होती…!

भगवंताचे आणि माझे खुप सुंदर नाते आहे…
मी जास्त काही मागत नाही आणि
भगवंत मला काही पडु देत नाही…
आणि यालाच आपला प्रारब्ध म्हणतात….!

आयुष्य हे खुप सुदंर आहे… अगदी आनंदाने जगा…!

Good Thoughts in Marathi | प्रारब्धाचा हिशोब | सुंदर विचार

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील

50+ Marathi Quotes | प्रेरणादायक सुविचार मराठी

Wishes For New Born Baby In Marathi | बाळ जन्माच्या शुभेच्छा

1
Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb
Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb

Wishes For New Born Baby In Marathi
बाळ जन्माच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो….
VB Good Thoughts या ब्लॉगवर आपले मनापासून स्वागत आहे.
आपण जर का
New Born Baby Girl Wishes In Marathi,
Marathi Wishes For New Born Baby,
Best Wishes For New Born Baby In Marathi,

नवीन बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा,
नविन बाळाचे स्वागत शुभेच्छा,
लहान बाळाला शुभेच्छा, शोधत आहात तर आपण अगदी योग्य
ठिकाणी आले आहात…!

या ब्लॉगवर आपणासाठी खूप चांगली आणि नवनवीन आणि
छान छान व्हाट्सअप स्टेटस आणि फोटो शुभेच्छा…
आणि खूप काही…

मला विश्वास आहे की… ह्या नवीन बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक
शुभेच्छा, तुम्हाला नक्कीच आवडतील… तसेच या ब्लॉगमध्ये
फोटो च्या खाली… तुमच्यासाठी व्हाट्सअप मेसेज साठी
लिहून ठेवलेला आहे… ज्यामुळे तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने
त्याला कॉपी करून आपल्या मित्रांना…. नातेवाइकांना….
शेअर ही करू शकतात.

बाळ… या जगात तुझे स्वागत आहे
भगवंताची कृपा भरपूर प्रमाणात आहे
भगवंत तुला आशीर्वाद देतील हीच इच्छा आहे…
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा…!

Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb

आगमन झाले नवीन बाळाचे…
खूप खूप अभिनंदन आई-बाबांचे.
बाळाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा…!
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा…!

Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb

घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या
आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा…!
तुमच्या आकांक्षा… तुमची इच्छा…
उंच – उंच भरारी घेऊ दे…
आमच्या मनात एकच इच्छा…
बाळास आपली उदंड आयुष्य लाभू दे.
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा…!

Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb
Wishes For New Born Baby In Marathi – बाळ जन्माच्या शुभेच्छा

नवीन बाळापेक्षा काही,
मोठा आशीर्वाद नाही,
बाळ एक अमूल्य भेट आहे,
जेव्हा तुम्ही सभालणार त्याला…
तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करेल,
ही पण एक छान यात्रा ठरेल…
जन्माच्या हार्दिक शुभेच्छा…!

Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb

 

गजाननाच्या सारखीच बुद्धी…
आणि हनुमंता सारखी शक्ती
असा सर्वगुणसंपन्न बाळाच्या
जन्माच्या हार्दिक शुभेच्छा…!

new-born-baby-wishes-in-marathi-नवजात-बाळाला-जन्माच्या-शुभेच्छा-birthday-vb

 

ओठांवरती हसू… गालांवरती खडी…
संसार वृक्षाच्या वेलीवर उमलली एक कळी.
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा…!

Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb

लहानश्या पणतीने संपूर्ण घर प्रकाशित केले…
लहानश्या बाळाने संपूर्ण घर आनंदित केले.
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल
खूप खूप हार्दिक शुभेच्छा…!

Wishes For New Born Baby In Marathi - बाळ जन्माच्या शुभेच्छा - vb

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा – Happy Birthday Wishes marathi

Happy Birthday Wishes Marathi |वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी | जिभेवरचे शब्द

0
Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी | जिभेवरचे शब्द

कृतीला शब्दावर
अनुरूप करा…!
शब्दाला कृतीवर
अनुरूप करा…!
विल्यम शेक्सपिअर

Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी | जिभेवरचे शब्द

एक काका बांगड्या विकण्यासाठी नेहमीच गावात येत होते.
ते आजूबाजूच्या गावी फिरत असत… आणि गावोगावी फिरून
बांगड्या विकत असत. त्यांना गावात बांगड्यावाले काका
म्हणत असत.

त्याच्याकडे एक गाढवी होती, तिचा नाव काका ने राणी ठेवले होते…
ते त्या गाढवी च्या पाठीवर आपल्या बांगड्यांचा थैला अशा पद्धतीने
ठेवीत होते की सगळ्यांना रंगीबिरंगी बांगड्या दिसून पडतील.

यामध्ये असलेली छान गोष्ट म्हणजे… काकाचे राणीशी होणारे संभाषण…!

जर का चालतांना समोर दगड दिसला तर… काका म्हणायचे…. राणी बेटी…
समोर दगड आहे… थोडे बाजूने चाल…!

जर कधी गाढवी खूपच हळू चालायला लागली तर काका म्हणायचे…
अग राणी… थोडे घाईत पाय उचल…. गावोगावी माझ्या मुली माझी
वाट पाहत आहेत.

Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी
जिभेवरचे शब्द

जर राणी कधी वेगाने चालायला लागली… तर म्हणायचे… काय राणी बेटी…
आज काय हरीण झालीस कि काय…? (हे फारच क्वचित व्हायचे )
जरा सांभाळून पाय टाक. बांगड्या फुटतील ना बेटी…!
काका इतक्या प्रेमाने गाढवीशी बोलतात ते काय या गाढवीला समजत
असेल का… याचे सर्वांना आश्चर्यच वाटायचे.

एक दिवस बांगड्या घेत असतांना एका बाईने काकाला गाढवीसी
असे बोलतांना पाहिले आणि विचारले… जे दुसरे लोक गाढव पाळतात…
ते नेहमी हातात काठी ठेवतात…. अधूनमधून गाढवाला मारतात हि…
शिव्या हि देतात…. ओरडतात हे आम्ही पाहिले आहे…!
परंतु गाढवीला राणी बेटी म्हणणारे… इतके गोड बोलणारे तुम्ही
पहिलेच माणूस दिसता काका… असे कसे काय…?

बेटा त्याचे असे आहे… हा माझा व्यवसाय बांगड्या विकण्याचा आहे…
आणि हातात भरून देण्याचा आहे… माझ्या कडून बांगड्या ह्या मुली…
आई..बहिणी… घेतात… जर मी राणीला गाढवी म्हणायला लागलो…
तिला शिव्या द्यायला लागलो तर माझ्या तोंडातही तेच शब्द
बसलेले असतील…

जर एकदा कोणताही शब्द आपल्या जिभेवर बसला…
तर अचानकपणे… नकळत….तो शब्द कधी बाहेर येईल
हे काही सांगता येत नाही.

Sunder Vichar | मराठी प्रेरणादायक कहाणी
जिभेवरचे शब्द

मग बांगड्या विकतांना चुकून असे शब्द माझ्या तोंडातून
बाहेर पडतील. मी चुकूनही असा वाईट शब्द गावातल्या
मुलींशी, सूनांशी बोललो तर गावकरी माझे काय करतील…?
म्हणून मी माझ्या तोंडावर कधीही चुकीचा शब्द येवूच देत नाही.
मी आपल्या जिभेला वाईट शब्दांची सवय लावूनच देत नाही.

ही गोष्ट केवळ धंद्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी…
मित्रांसाठी… समाजात वावरण्यासाठी… संघटनेमधील
सदस्यांमध्ये समन्वय राखण्यासाठी… गोडवा निर्माण
करण्यासाठी अर्थात समाजामध्ये विविध स्तरातील
व्यक्तिंमध्ये ममता…. बंधुता प्रस्थापित करण्यासाठी
आवश्यक आहे.

जय श्रीराम

निवांतपणे वाचा हे मराठी सुविचार स्टेटस | मनाला खूप आनंद देतील